आजरा-वाटंगीत हत्तीचा धुमाकूळ : ट्रॅक्टर-बैलगाडीचे नुकसान

आजरा (प्रतिनिधी ) गेले महिनाभर आजरा तालुक्यात ठाण मांडून असलेला हत्ती आज तालुक्यातील वाटंगीत पुन्हा धुडगूस घातला. आज (गुरुवार) पहाटे हत्तीने धुमाकूळ घालत विष्णू गिलबिले यांच्या शेतातील ट्रॅक्टरसह बैलगाडी, पाण्याची टाकी, काजू व नारळाची झाडे यांचे प्रचंड नुकसान केले आहे. तर या हत्तीने पेद्रेवाडी, हाजगोळी, यमेकोंड परिसरामध्ये नुकसान सत्र सुरूच ठेवले आहे. आज पहाटे तर… Continue reading आजरा-वाटंगीत हत्तीचा धुमाकूळ : ट्रॅक्टर-बैलगाडीचे नुकसान

इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होणार प्रमुख शहरांचा विकास : आ. राजेश क्षीरसागर

मुंबई (प्रतिनिधी) : भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत- भारत @२०४७ (India@2047)” करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी विकासापर्यंत पोहचणे गरजेचे असून, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून राज्यातील शहरांचा विकास साध्य करू, असे प्रतिपादन मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पी पी पी) द्वारे महापालिकांचा… Continue reading इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होणार प्रमुख शहरांचा विकास : आ. राजेश क्षीरसागर

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शिवनाकवाडीला भेट : प्रशासनाला दिले आदेश

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवनाकवाडी येथे झालेल्या मोठ्या विषबाधेच्या घटनेनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने शिवनाकवाडी गावाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.तसेच गंभीर परिस्थितीची पाहणी करत त्यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला त्वरित उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि योग्य उपचार दिले जात आहेत की नाही याबाबत डॉक्टरांशी… Continue reading आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शिवनाकवाडीला भेट : प्रशासनाला दिले आदेश

आजरा तालुक्यातील चोरट्यांचा बंदोबस्त करा : उबाठा सेनेची मागणी

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात होणाऱ्या चोऱ्या रोखून चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे,गेल्या काही दिवसांपासून आजरा शहर परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य केली… Continue reading आजरा तालुक्यातील चोरट्यांचा बंदोबस्त करा : उबाठा सेनेची मागणी

नांगनूर-पंढरपूर माघवारी दिंडीचे प्रस्थान…

निपाणी (प्रतिनिधी) : निपाणी तालुक्याील नांगनूर येथे वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांतर्फे माघवारी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिंडीचे आज (बुधवार) सकाळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडीची नगरप्रदक्षिणा झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान झाले. बोरगाववाडी येथे दादा टाकणारे यांच्या घरी दिंडीचे पूजन आणि महाप्रसाद झाल्यावर तेथून दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. या सोहळ्यात पहाटे काकड आरती, सकाळी प्रवचन, दुपारी… Continue reading नांगनूर-पंढरपूर माघवारी दिंडीचे प्रस्थान…

संजीवनमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात संपन्न…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार घातले. या जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना या सूर्यनमस्काराचे अर्थात योगाचे ही महत्व विशद करण्यात आले. यावेळी फॉरेन रिटर्न योगगुरु संजय हाके आणि तृप्ती मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी… Continue reading संजीवनमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात संपन्न…

कुंभी धरणात ८३.९० टक्के पाणीसाठा शिल्लक : शेतकऱ्यांना दिलासा

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर तालुक्यांना समृद्ध करणाऱ्या कुंभी (लखमापूर) मध्यम प्रकल्पासह आणखी तीन लघु प्रकल्पांत पाठबंधारे विभागाच्या योग्य नियोजनामुळे फेब्रुवारीमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. कुंभी धरणात सध्या ८३.९० टक्के म्हणजे २.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून उर्वरित प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वच धरणांत गतवर्षी जेवढा पाणीसाठा होता तितकाच यंदा… Continue reading कुंभी धरणात ८३.९० टक्के पाणीसाठा शिल्लक : शेतकऱ्यांना दिलासा

कोल्हापूरच्या दक्षिण काशीचा कायापालट करु : सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आई अंबाबाईच्या कृपेने मला ही जबाबदारी मिळाली असून, नगर विकासासह कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित विविध खात्यांचा कार्यभार माझ्याकडे आहे. कोल्हापूर आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर असल्याचं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. माधुरी मिसाळ यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या १०० दिवसांच्या कामाच्या नियोजनात… Continue reading कोल्हापूरच्या दक्षिण काशीचा कायापालट करु : सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

प्रत्येक क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष,आमदार राजेश क्षीरसागर… Continue reading प्रत्येक क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : आ. राजेश क्षीरसागर

धुळीने माखली कळे बाजारपेठ : प्रदुषणामुळे नागरिक हैराण

कळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर-कळे-बाजारभोगाव-अणुस्कुरा-राजापूर हा कोकणाला जोडणारा महत्वाचा रस्ता असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. पन्हाळा तालुक्यातील कळे येथील मुख्य बाजारपेठ याच रस्त्यावरती वसली आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागातील कळे ही मोठी बाजारपेठ असून येथे नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. गेली अनेक वर्षे या रस्त्यावरील उन्हाळा-पावसाळा खाचखळगे व दलदलीमुळे येथील नागरिक व व्यापारी वर्गाला नाहक… Continue reading धुळीने माखली कळे बाजारपेठ : प्रदुषणामुळे नागरिक हैराण

error: Content is protected !!