सुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये राष्ट्पती राजवट लागू करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. राज्यातील ठाकरे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची याचिका विक्रम गेहलोत यांनी दाखल केली होती. मात्र आज (शुक्रवार) या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला असून आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकता अशा शब्दांत याचिकाकर्त्याला सुनावले आहे. यामुळे… Continue reading सुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका

देशातील ‘सूनबाईंना’ आता ‘सुप्रीम संरक्षण !’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इतर देशांच्या तुलनेत भारतात कुटुंबव्यवस्थेला महत्त्व आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत ती अजूनही बऱ्याच अंशी टिकून आहे. अपवाद वगळता बहुतांशी घरात सासू-सून यांच्यात वाद होतोच. सासू-सुनेच्या किंवा नवरा-बायकोच्या भांडणात घरगुती हिंसाचारातून अनेकदा सुनेला घराबाहेर काढलं जातं. याच संदर्भात सर्वोच्च न्यायलयानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पतीचा हक्क असलेल्या अथवा पतीसोबत राहात असलेल्या घरातून… Continue reading देशातील ‘सूनबाईंना’ आता ‘सुप्रीम संरक्षण !’

जाणून घ्या, नवरात्रोत्सवाचे महत्त्व अन् घटस्थापनेचा मुहूर्त, विधी…

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित… Continue reading जाणून घ्या, नवरात्रोत्सवाचे महत्त्व अन् घटस्थापनेचा मुहूर्त, विधी…

टीआरपी घोटाळाप्रकरणी उपग्रह वाहिन्यांना ‘बार्क’चा दणका !  

मुंबई (प्रतिनिधी) : बहुचर्चित टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर पुढील १२ आठवड्यांसाठी म्हणजे ३ महिन्यांसाठी ‘बार्क’ने (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) टीआरपीवर बंदी आणली आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर बार्कने हा निर्णय घेतला आहे. न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. टीआरपी घोटाळ्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बार्कने आपल्या तांत्रिक… Continue reading टीआरपी घोटाळाप्रकरणी उपग्रह वाहिन्यांना ‘बार्क’चा दणका !  

एकनाथ खडसेंबाबत चंद्रकांतदादांचे महत्त्वाचे विधान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षत्यागाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पाटील यांनी आज (गुरुवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, खडसे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. पक्षाची हानी होईल, असा निर्णय ते घेणार नाहीत. भाजपचे… Continue reading एकनाथ खडसेंबाबत चंद्रकांतदादांचे महत्त्वाचे विधान…

‘ईपीएफओ’कडून आता सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) सदस्यांच्या तक्रारीनंतर व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या दुसऱ्या माध्यमांमध्ये वारंवार सद्स्यांकडून तक्रार येत असल्यामुळे त्यांच्या समाधानासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रारींचे समाधान पोर्टल (EPFIGMS Portal), सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म फेसबुक आणि ट्विटर, २४… Continue reading ‘ईपीएफओ’कडून आता सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन..!

राज्यात सलग चार दिवस मुसळधार : सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत १६ ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे १८ तारखेपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे  आणि प्रशासनाने सतर्क… Continue reading राज्यात सलग चार दिवस मुसळधार : सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

माझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची गरज नाही ! : मुख्यमंत्री 

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील बंद मंदिरावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवणही करून दिली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे राज्यपालांना सुनावले.  बार, रेस्टॉरंट सुरू झाले,  देवच कुलूपबंद का ? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला का ?… Continue reading माझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची गरज नाही ! : मुख्यमंत्री 

दोन दिवसांत मुसळधार : ‘आयएमडी’कडून सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचे रुपांतर वादळात होऊ शकते. त्यामुळे पाच राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात आणखी एक… Continue reading दोन दिवसांत मुसळधार : ‘आयएमडी’कडून सतर्कतेचा इशारा

…म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

मुंबई (प्रतिनिधी) : बिहार विधानसभेची निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचं चिन्ह ‘बाण’ आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे. याबाबत जेडीयू पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हामुळे… Continue reading …म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

error: Content is protected !!