शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.… Continue reading शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (शनिवार) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भरत गावित यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. माणिकराव गावित यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल… Continue reading माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

संघाच्या दसरा सोहळ्यात महिला गिर्यारोहक प्रमुख पाहुण्या

नागपूर (वृत्तसंस्था) : दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नागपुरात संघ मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यात संतोष यादव यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. संघाच्या दसरा कार्यक्रमात एखादी महिला ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघटनेच्या बैठकीत महिलांचा सहभाग तुलनेने कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. या दरम्यान,… Continue reading संघाच्या दसरा सोहळ्यात महिला गिर्यारोहक प्रमुख पाहुण्या

सात दशकानंतर आठ चित्ते भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये ४ मादी आणि ३ नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त… Continue reading सात दशकानंतर आठ चित्ते भारतात दाखल

जिल्हा परिषदमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत असून आज जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी… Continue reading जिल्हा परिषदमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ

‘हा’ सर्वोत्कृष्ट पुरस्कार यंदा छ. शाहू साखर कारखान्याला : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ-को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली ही संस्था सर्वोत्कृष्ठ कारखान्याला वसंतदादा पाटील पुरस्काराने सन्मानित करते. यंदाचा हा पुरस्कार २०२१-२२ साठी कागल येथील छ. शाहू सहकारी साखर कारखान्याला मिळाला असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी आज (गुरुवार) सांगितले. समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शाहू साखर कारखान्याला राष्ट्रीय आणि… Continue reading ‘हा’ सर्वोत्कृष्ट पुरस्कार यंदा छ. शाहू साखर कारखान्याला : समरजितसिंह घाटगे

राधानगरी तालुक्यातील ‘या’ योजनांच्या खर्चावरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली…

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विशेष ९ विविध योजनांच्या कामांसाठी देण्यात आलेल्या ५८ कोटी रुपयांवर  स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविण्याचे आदेश आज (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. या बैठकीत राधानगरी तालुक्यातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच आ. प्रकाश आबिटकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव… Continue reading राधानगरी तालुक्यातील ‘या’ योजनांच्या खर्चावरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली…

अभियंत्यांमुळेच विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा विकास : अजितकुमार माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकास शक्य झालेला आहे. अभियंत्यांमुळेच देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजितकुमार माने यांनी केले. अभियंता दिनानिमित्त ते जिल्हा परिषदेत बोलत होते. जि. प. मधील ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभाग यांच्या वतीने… Continue reading अभियंत्यांमुळेच विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा विकास : अजितकुमार माने

काँग्रेस कमिटीत रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची ११३ वी जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी साजरी करण्यात आली. प्रथम कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, किशोर खानविलकर, संजय पवार वाईकर, रंगराव देवणे, हेमलता माने, मतीन शेख, अर्जुन सकटे,… Continue reading काँग्रेस कमिटीत रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वय आवश्यक : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना आ. सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य पातळीवरील समस्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याच्या… Continue reading उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वय आवश्यक : आ. सतेज पाटील

error: Content is protected !!