जाणून घ्या, नवरात्रोत्सवाचे महत्त्व अन् घटस्थापनेचा मुहूर्त, विधी…

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित… Continue reading जाणून घ्या, नवरात्रोत्सवाचे महत्त्व अन् घटस्थापनेचा मुहूर्त, विधी…

टीआरपी घोटाळाप्रकरणी उपग्रह वाहिन्यांना ‘बार्क’चा दणका !  

मुंबई (प्रतिनिधी) : बहुचर्चित टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर पुढील १२ आठवड्यांसाठी म्हणजे ३ महिन्यांसाठी ‘बार्क’ने (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) टीआरपीवर बंदी आणली आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर बार्कने हा निर्णय घेतला आहे. न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. टीआरपी घोटाळ्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बार्कने आपल्या तांत्रिक… Continue reading टीआरपी घोटाळाप्रकरणी उपग्रह वाहिन्यांना ‘बार्क’चा दणका !  

‘ईपीएफओ’कडून आता सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) सदस्यांच्या तक्रारीनंतर व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या दुसऱ्या माध्यमांमध्ये वारंवार सद्स्यांकडून तक्रार येत असल्यामुळे त्यांच्या समाधानासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रारींचे समाधान पोर्टल (EPFIGMS Portal), सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म फेसबुक आणि ट्विटर, २४… Continue reading ‘ईपीएफओ’कडून आता सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन..!

मुंबईतील ‘बत्ती गुल’वरून ऊर्जामंत्र्यांचे खळबळजनक विधान !

मुंबई (प्रतिनिधी) : सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झाले होते. पण राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित होण्यामागे धक्कादायक ट्विट केले आहे. सोमवार दिनांक 12.10.20… Continue reading मुंबईतील ‘बत्ती गुल’वरून ऊर्जामंत्र्यांचे खळबळजनक विधान !

नोव्हेंबरमधील ‘एमपीएससी’ परीक्षाही पुढे ढकला : विनायक मेटे

नाशिक (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘एमपीएससी’ची परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. ते म्हणाले… Continue reading नोव्हेंबरमधील ‘एमपीएससी’ परीक्षाही पुढे ढकला : विनायक मेटे

एम.पी.एस.सी. परीक्षा घेणे षडयंत्र : आमदार विनायक मेटे

पुणे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एम.एस.सी.ची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थी टाहो फोडत आहेत. मात्र सरकार परीक्षा पुढे ढकलायला तयार नाही. आताच एम.पी.एस.सी परीक्षा घेणे हे ठाकरे सरकारचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, येत्या ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एम.पी.एस.सी.… Continue reading एम.पी.एस.सी. परीक्षा घेणे षडयंत्र : आमदार विनायक मेटे

१० ऑक्टोबर बंदला वंचितचा पाठिंबा : अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणप्रश्नी येत्या १० तारखेला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी मला १० तारखेच्या बंदला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात… Continue reading १० ऑक्टोबर बंदला वंचितचा पाठिंबा : अॅड. प्रकाश आंबेडकर

‘त्या’ अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

पुणे (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्याजवळील नवले पुलानजीक भरधाव ट्रकने तब्बल १५ वाहनांना धडक दिली. या विचित्र आणि भीषण अपघातात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. यामुळे ८ वर्षापूर्वी झालेल्या एसटी अपघाताच्या आठवणी पुणेकरांच्या जाग्या झाल्या.  नवले पुलाजवळ १५ गाड्या एकमेकांना धडकल्या.… Continue reading ‘त्या’ अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

…म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

मुंबई (प्रतिनिधी) : बिहार विधानसभेची निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचं चिन्ह ‘बाण’ आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे. याबाबत जेडीयू पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हामुळे… Continue reading …म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का? यावर आता रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण नोटांनी देखील होऊ शकते. नोटांचा व्यवहार केल्याने कोरोना संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स(CAIT) ने म्हटलंय. नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयने याला दुजोरा दिला आहे.  चलनातील नोटा या बॅक्टेरीया… Continue reading नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का?

error: Content is protected !!