( टोप प्रतिनिधी ) जोपर्यंत कारखानदार गुडघे टेकत नाहीत तोवर माघार नाही. काहीपण होवू दे अशी भुमिका स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

आज सकाळपासून पुणे – बेंगलोर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे. यामुळे महामार्गावर लांबच – लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, पोलिसांनी आम्हाला अटक करणार असतील तर येथे असणाऱ्या सर्वांना अटक करा. एका कोणाला अटक करायची नाही असे शेट्टी म्हणाले. तसेच अटक केली आणि परत सोडले तर परत येथेच महामार्गावर येवून बसणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे आज सकाळी 11 पासून बंद असलेला महामार्ग दुपारी 2वाजले तरी बंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.