नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या पुढे अनेक संघांनी माना टाकल्या आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सलग 8 सामने जिंकले आहेत. त्यांचा शेवटचा सामना नेदरलँडशी आहे. अशा परिस्थितीत आता प्रतिस्पर्धी संघ बाद फेरीत टीम इंडियाविरुद्ध रणनीती बनवण्यात व्यस्त असेल.

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने या स्पर्धेत भारताचे वादळ कसे रोखले जाऊ शकते हे सांगितले आहे. याशिवाय त्या चार खेळाडूंचीही नावे सांगितली होती. ज्यांच्यापासून प्रतिस्पर्ध्यांना दूर राहावे लागणार आहे.

फॉक्स क्रिकेटशी बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला की, भारतीय क्रिकेट संघाची फलंदाजी नेहमीच धोकादायक राहिली आहे. मात्र, 2023 च्या विश्वचषकात भारताची गोलंदाजीही जोरदार आहे. याशिवाय टीम इंडियाची सर्वात मजबूत बाब म्हणजे ती लक्ष्याचा पाठलाग करताना बाकीच्यांपेक्षा 10 पावले पुढे आहे. संघात विराट कोहलीसारखा तगडा फलंदाज आहे ज्याला धावांचा पाठलाग करायला आवडते.

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने केवळ धावांचा पाठलागच नाही तर प्रथम फलंदाजी करत सामनाही सहज जिंकला आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले तर प्रतिस्पर्धी संघाने भारताला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण दिवसाच्या तुलनेत रात्री मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना खेळणे थोडे सोपे होते. असे ही त्यांने म्हटले आहे.