मुगळी (प्रतिनिधी) : चंदगडचा दौलत साखर कारखाना अतिशय सुरळीत सुरू होता. आमदार राजेश पाटील यांनी तो अट्टाहासाने बंद पाडला. तो कारखाना कोणालाच चालवूच द्यायचा नाही, हेच त्यांचे धोरण असल्यामुळे आ. राजेश पाटील गोडसाखर काय चालवणार ? असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याणवर यांनी केला. ते गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते.

गड्ड्याणवार म्हणाले की, आ. राजेश पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच ते सभेत चिथावणीखोर वक्तव्ये करीत आहेत. गोडसाखरचे राजीनामा दिलेले बारा संचालक नालायक आहेत. त्यांना वेशीतच रोखा, अशी भाषा करीत असल्याचे सांगितले.

आ. हसन मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजला लागूनच असलेल्या कागल तालुक्यात पाच साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चांगल्या पद्धतीने चालत आहेत. मग गडहिंग्लज तालुक्यात एकमेव असलेला गोडसाखर का बंद पडतो ? याचे परीक्षण करण्याचे आवाहन केले.

डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, आ. हसन मुश्रीफ यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून त्यांच्या नेतृत्वाखाली गोडसाखरला ऊर्जितावस्थेत आणून पुनरूज्जीवन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी संग्रामसिंह कुपेकर, ऊदय जोशी, मंगल आरबोळे, नागेश चौगुले, रमेश रिंगणे, अरूण बेल्लद, विठ्ठल भमाणगोळ, बसवराज आजरी, अनिल कुराडे आदी उपस्थित होते.