पंढरपूर (प्रतिनिधी)  : पंढरपूरमध्ये लाखो भाविक दररोज विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या भाविकांना अन्नांतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भाविकांना जेवल्यानंतर अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला.

पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील सुमारे ३० पेक्षा अधिक नागरिकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रभागा नदीकाठच्या असणाऱ्या अन्नपूर्णा भोजनालय व हॉटेल परब्रम्ह या दोन्ही ठिकाणी हे भाविक जेवले होते. जेवणानंतर या भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.