अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण… – देवेंद्र फडणवीस

मुंबई – अजित पवारांनी शरद पवारांना सोडून महायुतीत सहभागी झाले.त्यानंतर राजकीय वर्तुळात तुफान आल्याचं पाहायला मिळाले. शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सोडल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय अजित पवारांसाठी सोपा नव्हता. माजी कृषीमंत्री शरद पवारांना आणि त्यांच्या सहकुटुंबाना अजित पवारांचा हा निर्णय आवडला नव्हता. तरी ही परिवारातील सदस्यांचा नाराजीचा सूर पत्करून… Continue reading अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण… – देवेंद्र फडणवीस

मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपी फरार; बलात्कार प्रकरणात ही होता अटकेत

मुंबई ( वृत्तसंस्था ) मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील संशयित आरोपी भावेश भिंडे (51) यांची गुन्ह्याची कुंडली बाहेर आली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गोळा केलेल्या तपशिलानुसार भिंडे यांच्यावर सुमारे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. यात बलात्काराच्या एका प्रकरणाचाही समावेश आहे. दोन महिन्यांपूर्वी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक भावेश भिंडे याच्यावर त्याच्या… Continue reading मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपी फरार; बलात्कार प्रकरणात ही होता अटकेत

शिंदेंना दणका, कल्याण जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

कल्याण : महाराष्ट्र लोकसभेसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्या आधी कल्याणमध्ये मोठी घडामोड घडली आहे. . शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी नाराजी नाट्य समोर आल्याने आता कल्याणच्या राजकारणात मोठा… Continue reading शिंदेंना दणका, कल्याण जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते  प्रफुल पटेल यांनी काल केलेल्या कृत्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता.या प्रकरणावर आता प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट बांधला जाणारा जिरेटोप प्रफुल पटेल… Continue reading ‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

पंतप्रधान मोदी जिथे जाणार, तिथे मविआ जिंकणार : संजय राऊतांचा दावा

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 13 मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर 20 मे ला पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा आज मुंबई उपनगरातील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर… Continue reading पंतप्रधान मोदी जिथे जाणार, तिथे मविआ जिंकणार : संजय राऊतांचा दावा

राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र येणार..?

मुंबई – लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना आपला बिनशर्ती जाहीर पाठिंबा दर्शवला होता. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जाहीर सभा घेऊन त्यांनी आपल्या मनसैनिकांना जाहीर केलं होत. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या आणि भाजपच्या प्रचार सभा घेत असताना पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचार करत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह राज्यातील अनेक… Continue reading राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र येणार..?

वाकोल्यात शिंदे – ठाकरे गटात राडा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर राज्यातील शिवसैनिक दोन गटात विभागाला गेला.काही जणांनी उद्धव ठाकरे  यांची साथ कायम ठेवली तर काही जणांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. मंगळवारी वाकोल्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाल्याच पाहायला मिळालं. भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम आणि नीलम गोऱ्हे यांच्या सभेनंतर हा वाद झाला.… Continue reading वाकोल्यात शिंदे – ठाकरे गटात राडा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक…

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री, भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. राजमाता माधवी राजे शिंदे यांचे दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. माधवी राजे शिंदे या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. उद्या (गुरुवार) त्यांचे पार्थिव ग्वाल्हेरला आणले जाणार असून तिथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राजमाता… Continue reading केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक…

गाझामधील हल्ल्यात कर्नल वैभव काळे शहीद…

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय लष्करामधून निवृत्त झालेले कर्नल वैभव अनिल काळे (वय 46) यांचे गाझामधील एका हल्ल्यात निधन झाले आहे. वैभव काळे हे मूळचे नागपुरमधील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून वैभव काळे कार्यरत होते. गेल्या वर्षी गाझामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा… Continue reading गाझामधील हल्ल्यात कर्नल वैभव काळे शहीद…

‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदानाचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी येथे जाऊन वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रॉड शो आहे. पंतप्रधान… Continue reading ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

error: Content is protected !!