मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालेच नसते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटले, यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी केले.राज ठाकरे यांनी एमआयजी कल्बमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते

काय म्हणाले राज ठाकरे..?

देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषय राहू गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिले आहे. त्यावेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. शरयू नदीत त्यांची प्रेते फेकली गेली होती. राम मंदिरासाठी चाललेले हे दीर्घ आंदोलन विसरता येणार आहे. आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते, मी नरेंद्र मोदी यांच्या काही धोरणांचा विरोधही केला आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक आहे, असे मला वाटले. त्यामुळे पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रासाठी आपल्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा संरक्षण, तरुणांना रोजगार, मराठी भाषेला अभिजात दर्जाहे हे विषय आहे. ते मार्गी लागतील. असे ते म्हणाले

राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांची राजीनामे सत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाढव्याला जाहीर सभेत महायुतीत जाण्याची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेते त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. सोबतच त्यांचा हा निर्णय मनसैनिकांना सुद्धा काही खास रुचलेला दिसत नव्हता . मनसेच्या कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचं पाहायला मिळत होत त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. अशातच राज ठाकरे यांनी एमआयजी कल्बमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपली भूमिका राज ठाकरेंनी समजावून सांगितली असल्याचं बोललं जात आहे