मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज सकाळी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी यात अनेक घोषणा केल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात विकास करु, असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं आहे. आपल्या वचननाम्यात उद्धव ठाकरेंनी शेतकरी वर्ग, महिला आणि बेरोजगारांसाठीही अनेक घोषणा केल्या आहेत.

ठाकरे गटाच्या वचननाम्यात काय?
राज्यात चाललेली लूट थांबवू, महाराष्ट्राचं वैभव वाढवू.
वित्तीय केंद्र नव्याने उभारू, युवकांना नोकरीच्या संधी देऊ.
जिल्हा रुग्णालये अद्यायावत करू.
ग्रामीण भागात, प्राथमिक उपचार केंद्र आधुनिक करणार.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, पीकविमाचे निकष बदलू.
बी-बीयाणे, खतं यांच्यावरील जीएसटी मुक्त करु.
तसंच, शेतकऱ्यांना गोदामं, शितगृह देऊ.
कृषीखात्यात सर्व्हे करणारं विभाग स्थापन करून, ज्या पिकाला मागणी आहे, तेच पीक घ्यायला सांगणार त्याला
शेतकऱ्यांना हमीभाव देणारच
उद्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करू, पर्यावरण स्नेही उद्योग आणू
सत्तेचं विकेंद्रीकरण करु
कर दहशतवाद थांबवू
जीएसटीमधील त्रासदायक अटीशर्थी आर्थिक सल्लागारांशी बोलून थांबवू
सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलासांठी 50 टक्के जागा देणार, सुरक्षा देणार.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थीर ठेवण्याचा प्रयत्न करू.