कबनूर (प्रतिनिधी ) -“देशाच्या उज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे काळाची गरज आहे.मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करणे अत्यावश्यक आहे.”असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभेत मुश्रीफ बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले,”मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याची धमक धैर्यशील माने यांची आहे.त्यामुळे धनुष्यबाणला मताधिक्य द्या.”वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी म्हणाले,”धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने मतदारसंघात प्रचंड निधी आणला. त्यामुळे धैर्यशील माने यांना मताधिक्य देणे कर्तव्यच आहे. यावेळी राहुल कांबळे यांनी स्वागत केले. युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले.अशोक स्वामी, विजया पाटील,मधुकर मणेरे,रेश्मा सनदी,प्रमोद पाटील,अशोक पाटील यांची भाषणे झाली.

यावेळी जेष्ठनेते बी.डी.पाटील,सरपंच शोभा पोवार,विठ्ठल चोपडे,विनायक यादव,यासीन मुजावर,तोफिफ मुजावर,बबन इंगळे,रजनी गुरव सुधाराणी पाटील,रोहिणी स्वामी आधी उपस्थित होते.माजी सरपंच सुधीर पाटील यांनी आभार मानले.