इचलकरंजी शहरामधील शिवस्मारक सुशोभीकरणाचे काम गतीने सुरू आहे. मात्र वारंवार विनंती करून निधी उपलब्ध न केल्याने आज इचलकरंजी पालिकेच्या आवारात शिवस्मारक सुशोभिकरण समितीने ठिय्या आंदोलन केले.
इचलकरंजी शहरामधील शिवस्मारक सुशोभीकरणाचे काम गतीने सुरू आहे. मात्र वारंवार विनंती करून निधी उपलब्ध न केल्याने आज इचलकरंजी पालिकेच्या आवारात शिवस्मारक सुशोभिकरण समितीने ठिय्या आंदोलन केले.
आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. यातून आशा कर्मचाऱ्यांचे सर्वच प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास नेत्रदीपा पाटील यांनी व्यक्त केला. https://youtu.be/i8axefAK4iI
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवार रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात वास्तव्याला असलेल्या परप्रांतीयांनी गावी जाण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी केली.
कोल्हापूर शहरात संचारबंदीमुळे व्यापार, उद्योग बंद राहिल्यामुळे वाहतूकही मंदावली आहे.
कोल्हापूर शहरात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अत्यावशक सेवा वगळता सर्वच ठिकाणचे इतर व्यवसाय बंद राहिले.
बेशुद्धावस्थेत सापडलेले पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांचा आत्महत्येचा प्रयत्न नसून ते नशेत बेशुद्ध झाल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाने केला आहे.
कोल्हापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही, याचाच प्रत्यय आज गुढीपाडव्यादिवशी आला.
कोल्हापूर शहरासह विविध प्रश्न केवळ ना. सतेज पाटील यांचेमुळेच मार्गी लागले आहेत. त्यामुळे ते जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने पालक असल्याच्या भावना माजी नगरसेवक राहुल माने यांनी व्यक्त केल्या.
सदैव जनतेच्या हितासाठी झटणारे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटीलसाहेब यांचा वाढदिवस म्हणजे सर्वांच्याच दृष्टीने लोकोत्सवच असल्याची भावना दीपकसिंह पांडुरंग पाटील (प. महा. संपादक – दक्ष पोलीस टाइम्स) यांनी व्यक्त केली.
राजकारणाचा वापर फक्त समाजकारणासाठी करणारे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सतत कार्यमग्न असणारे नेते हीच पालकमंत्री सतेज पाटील यांची मुख्य ओळख असल्याची भावना माजी उपमहापौर अर्जुन माने यांनी व्यक्त केली.