मुंबई (प्रतिनिधी) :  कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालले आहे. राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वाभाविक आहे. हा प्रयत्न करण्यासंदर्भात आमच्या सर्व पक्षांचे सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय.