आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता आजरा शहर ८ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. मंगळवार ४ मे ते ११ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरात जनता कर्फ्यु असणार आहे. यामध्ये भाजीपाला आणि इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांना दंड करून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.