कोतोली (प्रतिनिधी) : मुंबई येथील सत्यमेव जयते संघटनेच्या महाराष्ट्र सचिवपदी गगनबावडा तालुक्यातील जी. एस. कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कांबळे यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष डॉ. अफजल देवळेकर यांनी दिले आहे.

मुंबई येथे अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर पदाधिकारी आहेत. प्रदेश सचिवपदी निवड झालेले जी. एस. कांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सामाजिक न्यायाचे कार्याध्यक्ष आहेत. यावेळी सत्यमेव जयते संस्थेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अफजल देवळेकर, सुनील सामंत, मातोश्री पतसंस्थेचे संचालक दिलीप पाटील आदी उपस्थित होते.