मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्प्याचा लोकार्पण सोहळा नागपूरमध्ये पार पडला. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे; मात्र या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. याबाबत आ. आदित्य ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. ते आरेतील सावरकर उद्यानात बोलत होते.

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आम्हाला कोणतेही आमंत्रण आलेले नाही. आम्हाला आमंत्रण का दिले नाही हे सरकारला तुम्हीच विचारा, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.