मुंबई – गेले कित्येक दिवस एकच चर्चा होती ती म्हणजे राज ठाकरे महायुती सोबत जाणार कि नाही..? जेव्हा राज ठाकरे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची जाऊन भेट घेतली त्यानंतर या चर्चाना वेग आला होता. ज्या प्रश्नाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिले होतं त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मनसैनिकांसाठी मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे’, असं वक्तव्य करत शिवतीर्थावरील गुढीपाडव्या मेळाव्यातून मोठी घोषणा केली. एकीकडे या घोषणेनंतर राज ठाकरेंवर विरोधी पक्ष नेत्यांच्या हल्लाबोल सुरु आहे. तर दुसरीकडे मनसैनिक राज ठाकरेंच्या निर्णयाला नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्यांचा राजीनामा सत्र चालू झाला आहे.

मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते यांच्यासह सात जणांनी राजीनामा

डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते यांच्यासह सात जणांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा दिल्याचे मिहिर दवते यांनी सांगितले आहे. मनसेच्या सोशल मिडिया ग्रुपवर राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर डोंबिवलीतील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता डोंबिवलीत राजीनाम्याचे लोण आणखी पसरणार का? मनसेला आणखी किती मोठे खिंडार पडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राज ठाकरेंना अलविदा

राज ठाकरे यांच्या निर्णयानंतर मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मनसेला अलविदा करत असल्याचे जाहीर केले होते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांवेळी राज ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. आज अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी राजसाहेबांनी भूमिका बदलली. प्रबोधनकारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला ‘भामोशा’चं असलं राष्ट्रीयत्व- ‘हिंदुत्व’ मान्यच होऊ शकत नाही. त्यामुळे मी मनसेचे सरचिटणीसपद आणि प्राथमिक सदस्यत्त्वाा राजीनामा देत असल्याचे किर्तीकुमार शिंदे यांनी सांगितले होते.