हातकणंगले (प्रतिनिधी)  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील कसबा आळते येथे नियमांचे पालन करत भक्तीमय वातावरणात भगवान महावीर जयंती  आज (रविवार) साधेपणाने साजरी करण्यात आली.  महावीरांच्या प्रतिमेचे  पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिलांनी आरती करून सुंठवडयाचे वाटप केले. यावेळी बाळासाहेब पाटील, गणेश खटावकर यांनी भगवान महावीरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. अभिषेक पाटील, निखिल खटावकर,  शितल अंकलीकर,  अजय आवटे,  नेमिनाथ पाटील,  सचिन कोल्हापूरे, अक्षय पाटील,  प्रथमेश पाटील, मंदार गबाळे आदी उपस्थित होते.

आजच्या गतिमान जीवनात वर्धमान होण्याचा विचार मांडणारे व मानवी जीवनाचा कल्याणमार्ग दाखविणारे महापुरूष महावीरांचा अभ्यास होणे,  विचार रुजविणे समस्त विश्वाला गरजेचे आहे. महावीरांचे जीवन संकलन असणारी पुस्तकांचे वाचन करत राहू. महावीर समजावून घेऊ हीच आजच्या महावीर जयंती दिनी शुभेच्छा.