कागल (प्रतिनिधी) : कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दीडशे नागरीकांना मंजुरी पत्राच्या वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, १९८० साली तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेनी ही योजना सुरू केली. त्यावेळी दरमहा अवघे दोनशे रुपये पेन्शन होती. विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच त्यातील जाचक अटी दूर करून योजनेमध्ये अमुलाग्र बदल केला. येत्या काळात या योजनेची उत्पन्न मर्यादेची अट २० हजारावरून ५० हजार रुपये करणे, उत्पन्नाचा दाखला वर्षाला देण्याऐवजी तीन वर्षांनी देणे, लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाल्यानंतर लाभ बंद होण्याची तरतूद काढून टाकणे, तसेच महिन्याला एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी राजू माने, संजय ठाणेकर, नितीन दिंडे, सतीश घाडगे, रणजीत कांबळे, सुरेश बोभाटे, बाबुराव घडमोडे, शहनाज अत्तार आदी उपस्थित होते.