सांगली ( प्रतिनिधी ) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचे नेते माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने धैर्यशील माने यांच्याबाबत बंद खोलीत चर्चा केली.

यावेळी आण्णासाहेब डांगे म्हणाले . धनगर समाजाचे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत . त्यांची सोडवणूक होणे गरजेचे आहे . आरक्षणाच्या मुद्दयावर अनेक नेते बोलत असतांत पण तो प्रश्न मार्गी लावण्यांसाठी धैर्यशील माने यांनी लोकसभेत सातत्याने आवाज उठविला आहे . नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांना संत बाळू मामांची प्रतिमा भेट देऊन त्यांनी या प्रश्नाकडे परत एकदा मोदींचे लक्ष वेधून घेतले आहे . त्यामुळे पंतप्रधान मोदी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धैर्यशील माने यांच्या समन्वयातून धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे धनगर समाज नक्कीच माने यांच्या पाठीशी राहील आणि माने यांचा विजय सुकर होईल असा विश्वास डांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केला .