डाळी, गहू, तांदूळसह काही वस्तूंवरील जीएसटी मागे

नवी दिली (वृत्तसंस्था) : महागाईच्या झळा पोहोचत असताना केंद्र सरकारने जीएसटीच्या कक्षेत नसणाऱ्या गोष्टींवर जीएसटी आकारायचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आता जनतेच्या रोषाची दखल घेत आता केंद्र सरकारने काही वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सुट्या डाळी, गहू, मोहरी, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, दही आणि लस्सी यावर आता जीएसटी… Continue reading डाळी, गहू, तांदूळसह काही वस्तूंवरील जीएसटी मागे

कोल्हापूरचे दोन्ही खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत दिल्लीत

सरकारच्या भवितव्याच्या अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत : राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्या बुधवारपासून सुप्रीम कोर्टात सरकारच्या भवितव्याचा फैसला कऱणारी सुनावणी होणार आहे. त्याच अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत. काही प्रमुख नेत्यांना भेटत आहेत; पण कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आजही सुप्रीम कोर्टात रामशास्त्री बाण्याचे काही न्यायाधीश आहेत. त्यांच्याकडून न्यायाचा खून होणार नाही, याची खात्री आहे,’ असा विश्वास संजय राऊत यांनी… Continue reading सरकारच्या भवितव्याच्या अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत : राऊत

शिवसेनेचे १८ खासदार आपल्याबरोबर : शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  शिवसेनेचे १४ नव्हेच, तर १८ खासदार आपल्याबरोबर आहेत. सर्वजण येणार असून, त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे मध्यरात्री दोनच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत शिंदे गटाने आपली स्वत:ची कार्यकारिणी जाहीर… Continue reading शिवसेनेचे १८ खासदार आपल्याबरोबर : शिंदे

राष्ट्रपतीपदासाठी उत्साहात मतदान, २१ रोजी निकाल

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज (सोमवारी) निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये संसदेतील ९९.१८ टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली, तर महाराष्ट्रातील २८३ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे, तर २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. राष्ट्रपतीपदासाठी संध्याकाळी पाच वाजता मतदान संपले. या… Continue reading राष्ट्रपतीपदासाठी उत्साहात मतदान, २१ रोजी निकाल

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एस.टी. बस कोसळून १३ ठार

इंदौर (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोनदरम्यान सोमवारी सकाळी मोठा अपघात झाला. इंदौरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजता धामनोद येथील खलघाटाजवळ नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० ते ५५ प्रवासी होते. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचे मृतदेह आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली… Continue reading मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एस.टी. बस कोसळून १३ ठार

सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. पुढील आठवड्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती  वाढणार आहेत. अशा परिस्थितीत, घरगुती वस्तू, हॉटेल, बँक सेवा आणि बरेच काही यावर अधिक खर्च करावा लागणार आहे. दि. १८ जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणार आहेत. चंदीगडमध्ये झालेल्या दोन दिवसीय ४७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत केलेल्या… Continue reading सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार

१८ वर्षांवरील नागरिकांना १५ जुलैपासून बूस्टर डोस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या ७५ दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने कोविडच्या… Continue reading १८ वर्षांवरील नागरिकांना १५ जुलैपासून बूस्टर डोस

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर; राष्ट्रपतींचे मालदीवमध्ये पलायन

कोलंबो : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देश सोडून मालदीवमध्ये पलायन केले आहे. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक गोंधळ घालत आहेत, तर हजारो लोकांचा मोर्चा संसद भवनाकडे कूच करत आहे. जनतेचा तीव्र विरोध पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. हजारो… Continue reading श्रीलंकेत आणीबाणी जाहीर; राष्ट्रपतींचे मालदीवमध्ये पलायन

नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून… Continue reading नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार

error: Content is protected !!