टोप गावात १२ जूनपासून दहा दिवस जनता कर्फ्यू…

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून गावातील सर्वच भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे आज (बुधवार) दक्षता समितीच्या झालेल्या बैठकीत अत्यावश्यक सेवा वगळुन गावात १२ जून पासून दहा दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. टोप गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १०० जणांना कोरोनाची लागण झाली असून काही संशयित रुग्ण… Continue reading टोप गावात १२ जूनपासून दहा दिवस जनता कर्फ्यू…

अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘आप’चे सम्राटनगर येथे ओढ्यात उतरून आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथील ओढ्यात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात ओढ्या शेजारील घरांमध्ये पाणी येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र याविरुद्ध कोणतीच कार्यवाही न झाल्याने आम आदमी पक्षातर्फे आज (बुधवार) सम्राटनगर येथील ओढ्यात उतरून आंदोलन करण्यात आले. सम्राटनगर येथील ओढ्यामध्ये एका अपार्टमेंटची सुरक्षा भिंत (रिटेनिंग वॉल) व ‘बीएसएनएल’ने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात… Continue reading अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘आप’चे सम्राटनगर येथे ओढ्यात उतरून आंदोलन

चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (गुरुवार) त्यांच्या उपस्थितीत कोथरूड, पुणे येथे तर ११ रोजी कोल्हापुरात विविध उपक्रम होणार आहेत. दिनांक ११ जून रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर येथे असून वाढदिवस समितीच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून शुभेच्छा… Continue reading चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

राज्यातील पहिले लहान मुलांचे कोव्हिड सेंटर माणगांवमध्ये सुरू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील पहिल्या ग्रामपंचायत संचलित लहान मुलांच्या कोव्हिड सेंटर हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन माजी खासदार राजू शेटटी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आ. प्रकाश आवाडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी विकास खरात, हातकंणगले तहसिलदार उबाळे, जयसिंगपूर नगराध्यक्ष निता माने,… Continue reading राज्यातील पहिले लहान मुलांचे कोव्हिड सेंटर माणगांवमध्ये सुरू…

ऋतुराज फौंडेशनच्या वतीने वाफेच्या मशीनचे वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत या संकल्पनेनुसार हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या स्थरातून मदत केली जात आहे. ऋतुराज फौंडेशनच्यावतीने कोल्हापूर शहर आणि कोव्हिड सेंटरमधील रुग्ण, फ़्रंटलाइन वर्कर, वृद्धाश्रम आणि बालकल्याण संकुलामध्ये सहा हजार वाफेचे मशीन देण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, माज़ी उपमहापौर अर्जुन माने, कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वच दुकाने सुरु करण्यास अनुमती द्यावी, अन्यथा..! : धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमध्ये व्यापारी वर्ग सर्वाधिक भरडला गेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने समविषम तारखेला किंवा अन्य काही नियम लावून, व्यापार सुरू करण्यास परवानगी दयावी. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत तरी सध्या सर्व दुकाने उघडण्यास अनुमती दयावी. ज्या व्यापार्‍यांकडून सरकार कर गोळा करत आहे, त्यांच्यावरच अन्याय होत आहे. अशा परिस्थितीत तातडीने सर्व दुकाने… Continue reading सर्वच दुकाने सुरु करण्यास अनुमती द्यावी, अन्यथा..! : धनंजय महाडिक

कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा… : चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासन तसेच जिल्हा प्रशासनाने काढलेल्या अनलॉकच्या परिपत्रकानुसार व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले आहेत. शासनाच्या ४ जून २०२१ रोजीच्या नवीन परिपत्रकातील चुकीच्या नियमाप्रमाणे या आठवड्यात देखील व्यापार सुरु होऊ शकलेला नाही. मात्र, आता दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अन्यथा उद्या (बुधवार) रस्त्यावर उतरण्याचा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत… Continue reading कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा… : चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा

आषाढीवारीवरून वारकरी संप्रदाय आक्रमक : बंडातात्या कराडकरांचा सरकारला इशारा

पुणे (प्रतिनिधी) : मागील वर्षीप्रमाणे यंदाही आषाढीवारीवर कोरोना महामारीचे सावट आहे. त्यामुळेही मागील वर्षाप्रमाणे सर्व सोहळे प्रमुखांना पादुका बसमधून नेण्याचा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला. मात्र सर्व सोहळेप्रमुखांनी त्याला नकार दिला आणि पायी वारी करण्याची भूमिका घेतली. शासनाने यावर समिती नेमली आणि समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला. यावर निर्णय येण्यापूर्वीच वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी… Continue reading आषाढीवारीवरून वारकरी संप्रदाय आक्रमक : बंडातात्या कराडकरांचा सरकारला इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २,१७५ जणांची कोरोनावर मात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) दिवसभरात २,१७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या चोवीस तासात १, ४५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचारासाठी १२ हजार ७६८ रुग्ण दाखल आहेत.

राजाराम महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे जतन, संवर्धन करा : ना. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजाराम महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयातील कामकाज आणि सुविधांबाबतची माहिती घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची पाहणी करून डिजीटायझेशन करून या ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्याची सूचना केली. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना.पाटील यांनी दिली. ना. पाटील यांनी महाविद्यालयामधील प्राचार्य… Continue reading राजाराम महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे जतन, संवर्धन करा : ना. सतेज पाटील

error: Content is protected !!