मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. सर्व देशवासीयांच्या नजरा मतदानावर आहेत. काँग्रेस की भाजप कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात . आज ते एका नव्या कारणाने पुन्हा चर्चेत आले आहेत . शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेना मोठ उधाण आले. या खुलास्याने भाजपचे टेंशन नक्की वाढलं असणार आहे .

काय म्हणाले शरद पवार..?

शरद पवार एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी काँग्रेससाठी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांच्या सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे.

पुढे शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यांची विचारसरणी मी पाहिली आहे. ती आमच्यासारखीच आहे. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक आहे. परिस्थिती १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते. त्यावेळी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापेक्षा जास्त पाठिंबा राहुल गांधी यांना आहे. असे ते म्हणाले