कोल्हापूर, (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दमदार पावसामुळे  राधानगरी धरणात १२४.७२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी सकाळी ११ वा. च्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४० बंधारे पाण्याखाली गेले आहे.

दरम्यान, पाणी आलेल्या रस्त्यावर आणि पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात आली आहेत. संततधार पावसामुळे शहरात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. एसटी वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगाव व सरुड पाटणे, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदूळवाडी, शिगाव व खोची, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकूड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड व ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड असे ३९ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- तुळशी ५०.३७ दलघमी, वारणा ४९८.४४ दलघमी, दूधगंगा ३११.८० दलघमी, कासारी ४७.८४ दलघमी, कडवी ३७.८५ दलघमी, कुंभी ४२.४० दलघमी, पाटगाव ५५.९१ दलघमी, चिकोत्रा २२.९३ दलघमी, चित्री २३.९९ दलघमी, जंगमहट्टी १८.५० दलघमी, घटप्रभा- ४४.१७ दलघमी, आंबेआहोळ 22.25, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे- राजाराम ३२.०८ फूट, सुर्वे ३१.०७ फूट, रुई ६१.०६ फूट, इचलकरंजी ५८ फूट, तेरवाड ५१.०६ फूट, शिरोळ ४२ फूट, नृसिंहवाडी ४० फूट, राजापूर २९.०३ फूट, तर नजीकच्या सांगली १२ फूट व अंकली १७.०५ फूट अशी आहे.