सातारा ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. साताऱ्याच्या प्रवासादरम्यान त्यांनी कराडमधील गोवरे गाव येथील नागरिकांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेली दहा वर्षे देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि बहुजन वर्गाला केंद्रस्थानी ठेवून माननीय मोदीजींनी अनेक समाजोपयोगी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी अधिकाधिक मतदान करावे असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.