रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाणे हा अनेकांसाठी एक सामान्य विधी आहे. जेवणानंतर गोड खाणे जवळजवळ सर्वांनाच आवडते. यातही सरावात जास्त तीव्रतेने रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. साखर म्हणजेच गोड खाल्ल्याने डोपामाइन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे आपल्याला मनाला आनंद आणि समाधान मिळते. मग तो चॉकलेटचा तुकडा असो, आइस्क्रीमचा एक स्कूप असो किंवा घरगुती मिष्टान्न असो, आजच्या गोड निष्कर्षाचे आकर्षण निर्विवाद आहे. या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. तात्काळ समाधान आणि सांत्वन निर्विवाद असले तरी, संभाव्य परिणामांबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे. जाणून घ्या जेवल्यानंतर गोड खाल्यावर काय परिमाण होतात ते..?

वजन वाढणं

डॉ. सांगतात की रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. मिठाईमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर मिठाई खाणे आवर्जून टाळा. तसेच जेवण आणि झोप यात कमीत कमी २ तासांचे अंतर ठेवा. जेव्लायवर लगेच झोप नका, थोड शतपावली करा. नाहीतर गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

पचनसंस्थेवर परिणाम

वजन वाढण्यासोबतच रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. यामुळे आपली पचनक्रिया बिघडू शकते. पचनसंस्था आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित करते. तिचे कार्य बिघडले तर त्रास वाढू शकतो.

हृदयावर परिणाम

रात्री सतत मिठाई खाल्ल्याने तुमच्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. जास्त साखरयुक्त पेय प्यायल्याने, गोड पदार्थ खाल्याने वजन वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयावर परिणाम झाल्यास ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरते.

झोपेवरही होतो परिणाम

तज्ज्ञांच्या मते, रात्री गोड खाल्ल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. यामुळे मेंदू सक्रिय होतो, ज्यामुळे तुमचे रात्रीचे झोपेचे चक्र विस्कळीत होऊ शकते. झोपेची कमतरता असणे हे देखील अनेक आजारांचे कारण आहे.

साखरेच्या पातळीवर होतो परिणाम

रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी विस्कळीत होऊ शकते. कधी साखरेची पातळी वाढते तर कधी झपाट्याने घसरते. त्यामुळे चिंता, मूड बदलणे, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक ठरते.