विरोधकांचे आमच्यावर वैफल्यातून आरोप : सतीश पाटील (व्हिडिओ)

आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेतील कामकाजावरून विरोधक आमच्यावर वैफल्यातून आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिले आहे.  

आजची जि. प. सभा म्हणजे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने काळा दिवस : विजय भोजे (व्हिडिओ)

जिल्हा परिषदेची सभा गोंधळामध्ये गुंडाळण्यात आली, असा आरोप करीत हा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने काळा दिवस असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय भोजे आणि माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केली.  

‘त्यांना’ पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री ! : शरद पवार

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले आता पुन्हा माझ्याशी संपर्क साधू लागले आहेत. मात्र, सोडून गेलेल्यांना आता पुन्हा राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. अर्थात, शरद पवार यांनी डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता केलेल्या या विधानाची… Continue reading ‘त्यांना’ पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री ! : शरद पवार

महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे सर्वच प्रमुख पक्षांमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षातर्फे शहरातील सर्व प्रभागात उमेदवार देण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा असणारे आणि नवे इच्छुक असलेले प्रभागातील तरुण मंडळांशी संपर्क वाढवला आहे. महापालिकेवर सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे.… Continue reading महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली

राज्यपालपदावर राहायचे की नाही, हे ‘त्यांनी’ ठरवावे : शरद पवार

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना  या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचीही प्रतिष्ठा राखायला हवी. कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जी भाषा वापरली याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद… Continue reading राज्यपालपदावर राहायचे की नाही, हे ‘त्यांनी’ ठरवावे : शरद पवार

भटक्या-विमुक्त जातीजमाती तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल मलगुंडे…

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त जाती जमातीच्या तालुकाध्यक्ष पदी म्हासुर्ली पैकी बाजारीचा धनगर वाडा येथील विठ्ठल सोनबा मलगुंडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. सोळांकुर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.   ए. वाय. पाटील म्हणाले,  मलगुंडे यांनी या अगोदर राधानगरी तालुका धनगर समाज क्रांतिकारक… Continue reading भटक्या-विमुक्त जातीजमाती तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल मलगुंडे…

सारथीच्या मागण्या विषयी उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक : हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या ९ महिन्यात सारथीचे कामकाज ठप्प असल्याने स्वायतत्ता पूर्ववत ठेवावी या आणि इतर मागण्यांसाठी आंदोलने केली होती. नुकत्याच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठकीत पुणे येथे लालमहालावर आंदोलन जाहीर केले होते याची दखल घेऊन शासनाने सारथीला स्वायतत्ता देण्याचा आदेश दिल्याबद्दल नाम. मुश्रीफ यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सारथीसह मराठा… Continue reading सारथीच्या मागण्या विषयी उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक : हसन मुश्रीफ

आमच्यामुळे ‘ते’ घराबाहेर पडले : चंद्रकांत पाटील

सांगली (प्रतिनिधी) : आम्ही मागे लागल्यानेच मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. त्यासाठी बांधावर जावे लागते, असा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (रविवार) लगावला. ते सांगली येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांतदादा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी… Continue reading आमच्यामुळे ‘ते’ घराबाहेर पडले : चंद्रकांत पाटील

‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

मुंबई (प्रतिनिधी) : मंदिरं, रामलीला, मदरसे यावरून भाजपनं सध्या ठाकरे सरकारविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्यानं सुरू आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. या संबंधांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केले.… Continue reading ‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना लोकप्रतिनिधी जबाबदार : संभाजीराजे छत्रपती

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने ठोस मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकार तसेच लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. छत्रपती संभाजीराजे वेगवेगळ्या भागांना भेटी देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी गावाला त्यांनी भेट दिली. गावातील विहिरींचे कठडे तुटले आहेत. तसेच… Continue reading शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना लोकप्रतिनिधी जबाबदार : संभाजीराजे छत्रपती

error: Content is protected !!