मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू केले. पण नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसताय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्यापासून नवी नियमावली जाहीर करत निर्बंध अधिक कडक केले आहेत. या नव्या नियमांनुसार किराणा दुकानासह सर्व खाद्य पदार्थ आणि चिकन-मटणाची दुकानं सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू राहणार आहेत. खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी मात्र रात्री ८ वाजल्यापर्यंत सुरू राहणार आहेत. काल राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता. आज (मंगळवार) या संदर्भातील आदेश काढले आहेत.

काय आहे सुधारित नियमावली ?

  • किराणा दुकानासह सर्व खाद्यपदार्थ दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील.
  • होम डिलिव्हरी सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहील, परंतु स्थानिक प्रशासन यामध्ये बदल करू शकते
  • किराणा बरोबरच भाजी, फळे, बेकरी, दूध डेअरी, चिकन, अंडी, मटण, मासे याची विक्री करणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश 
  • राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व खाद्यदुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, फिशसह), कृषि उत्पादनाशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील.
  • मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळेबाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.