रत्नागिरी : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रिपद मिळवलं.नारायण राणे आणि उद्धव ठाकरे याचं शाब्दिक युद्ध हे नेहमीच चालू असत. दोघेही एकमेकांवर टीका करत असतात. राणे ठाकरेंबाबत काही खळबळजनक दावे देखील करतात. आता रत्नागिरीतील सभेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.

“उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात सर्वात जास्त त्रास  बाळासाहेब ठाकरे  यांना दिला आहे. दोन वेळा उद्धव मातोश्री सोडून बायको आणि मुलांसह अंधेरीला पळून गेले होते. तेव्हा बाळासाहेब त्यांना घरात घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी मीच त्यांना परत आणलं असा दावा राणेंनी केलाय.

उद्धव ठाकरे घर सोडून गेल्यावर बाळासाहेब त्यांना घरात घ्यायला तयार नव्हते. तेंव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मी त्यांना फोन केला आणि उद्धव ठाकरेंना घरात घ्यायला सांगा अस सांगितलं.यावर बाळासाहेब माझं ऐकत नाहीत तूच सांग अस जोशी म्हणाले. मग मी बाळासाहेबांना फोन केला आणि मला तुम्हाला भेटायचं आहे असं मी सांगितलं.माझ्या घरचा विषय काढायचा नाही असं बाळासाहेबांनी सांगितलं पण मी भेटायचा हट्ट केल्यावर ते तयार झाले.त्यानंतर मी अंधेरीला भेटायला गेलो आणि उद्धवना घरात घ्या असं सांगितल्यावर त्यांना घरात घेतलं असा दावा राणे यांनी केलाय. अस दोनवेळा घडलं असल्याचंही राणेंनी सांगितलं. मी बोलतो ते असत्य असेल, तर उद्धव ठाकरे यांनीच सांगावं, असं आव्हानही राणेंनी दिलंय.