मुंबई – अभिनेते ऋषी कपूर यांना जाऊन आता का चार वर्षे होतील. पण आजही त्यांचे चाहते ऋषी यांना विसरले नाहीयेत. त्यांचे कुटुंबिय देखील नेहमीच भावुक होताना दिसतात.ऋषी कपूर आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. ऋषी कपूर यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात. एका रिॲलिटी शोमध्ये नीतू कपूरने ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा सांगितली होती. ऋषी कपूर हयातीत असताना त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली असे नीतू कपूर यांनी सांगितले.

काय म्हणाल्या नीतू कपूर..?

एका रिएलिटी शो मध्ये ऋषी कपूर यांच्या अपूर्ण इच्छेबद्दल सांगताना नीतू कपूर यांनी सांगितले की, ऋषी कपूर यांची शेवटची एक इच्छा होती, जी अपूर्ण राहिली. त्यांना रणबीरचा विवाह पाहायचा होता. ज्यावेळी रणबीरचा विवाह पार पडत होता, त्यावेळी मी त्यांची इच्छा पूर्ण होताना पाहत होते आणि ऋषी कपूरदेखील त्यांची इच्छा असलेला रणबीरचा विवाह हा कुठून तरी पाहत असतील असे मला वाटले.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह 14 एप्रिल 2022 रोजी झाला. दोघे ब्रह्मास्त्र या सिनेमामध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले . 2016 पासून दोघे एकमेकांना डेट करत होते. रणबीर आणि आलियाचा विवाह सोहळा साधेपणाने घरीच पाडला होता. या विवाह सोहळ्यात दोघांचे कुटुंबीय आणि काही खास मित्रांनी सहभागी झाली होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.रणबीर-आलिया या दाम्पत्याला राहा नावाची मुलगी आहे.