मुंबई : ज्या व्यक्तीने शाळेत असताना कधी मॉनिटरची निवडणूक लढवली नसेल तो व्यक्ती काँग्रेस पक्ष चालवतोय’, अशी टीका गौरव वल्लभ यांनी जयराम रमेश यांच्यावर केली आहे.त्यांनी तीन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. गौरव वल्लभ यांनी ‘मी सनातनी विरोधी घोषणा देऊ शकत नाही’, असा जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसला रामराम केला.

गौरव वल्लभ म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाचा ग्राऊंड लेवल कनेक्ट पूर्णपणे तुटला आहे. “मी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा पक्षाचे ४२ खासदार होते. नवीन विचारांना प्रोत्साहन मिळेल या विचाराने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र असे काहीही झाले नाही. गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसचा जाहीरनामा एकच आहे. एक व्यक्ती तो तयार करत आहे, जर त्या व्यक्तीचे विचार ठाम असते तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती.जयराम रमेश यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे.

पुढे जयराम रमेश यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, “मी कॉलेजमध्ये असताना ती व्यक्ती काही वर्षांपूर्वी काँग्रेसची प्रवक्ता होती. आता ती संपर्क कक्षाची प्रमुख आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारसरणीत रस नाही. त्यांना फक्त त्यांची राज्यसभेची जागा राखण्यात रस आहे.”