दापोली – केळशी : -जोपर्यंत चंद्र -सूर्य असेपर्यंत संविधान बदलले जाणार नाही. मात्र दुषित वातावरण निर्माण करुन देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचे काम सोकॉल इंडिया आघाडीकडून दिला जात आहे, त्यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी केळशी येथे केले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रगती झाली आणि जगात विकसित भारत म्हणून नाव उदयास आणले आहे. खेड्यापाड्यातील विकास केला जातो तेव्हा तो देशाला विकासाकडे नेतो. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ज्या देशात नारी शक्तीचा सन्मान होतो तो देश नक्कीच प्रगतीपथावर वाटचाल करतो असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

कुणबी समाजाची १२ कोटींची वास्तू मुलुंड परिसरात उभी राहिली आहे. त्या वास्तूच्या उद्घाटनाला अनंत गीते निमंत्रण देऊनही आले नाही अशी कुत्सित बुध्दी पहायला मिळाले. या अनंत गीते यांनी समाजाचा एकही माणूस पुढे आणला नाही असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी केला.

अनंत गीते ३० वर्षात काय केले हे मतदारसंघात फिरताना सांगा असे आवाहन करतो मात्र अनंत गीते यांच्याकडे ३० वर्षात केलेले काम सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते जातीचे राजकारण करत आहेत असा आरोपही सुनिल तटकरे यांनी केला.

गेल्या दहा वर्षात जलदगतीने कोकणात अनेक विकासकामे आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. हे सांगतानाच बहुजनांसाठी काय करणार आहोत याचा रोडमॅप माझा तयार आहे मात्र अनंत गीते यांच्या भाषणात बूच, बाटली आणि भूत या व्यतिरिक्त काहीच नसते. ज्यांनी कित्येक वर्षे संसदेत काम केले त्यांची अशी भाषा असेल तर यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची असा सवालही सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला.

वार्‍याची जशी सुखद झुळुक येते आणि शरीराला विसावा वाटतो तशी विकासाची सुखद झुळुक तुमच्या मतदारसंघात आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

आपल्या मतदारसंघाला सुनिल तटकरे यांच्या रुपाने एक चांगली व्यक्ती मिळाली आहे आणि आज त्यांना मतदान करण्यास आम्ही चुकलो तर पुढची पिढी माफ करणार नाही असा दावा करतानाच सुनिल तटकरे हे अनंत गीते यांचे डिपॉझिट जप्त करणार म्हणजे करणारच असा ठाम विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

अनंत गीते सहावेळा निवडून दिलात तरी सातवेळा सुध्दा समाजाच्या नावावर मते मागणार का? ज्या समाजाची मते घेऊन निवडून आलात त्या समाजासाठी काय केले असा संतप्त सवाल रामदास कदम यांनी केला.

केळशी गावावर संकट आले त्यावेळी अनंत गीते कुठे होते असा प्रश्न प्रचाराला आले तर विचारा… आणि मग तुम्ही मतदान करा. संकट काळात फक्त आम्ही अजितदादांकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देत केळशी गावात लोकांच्या मदतीला धावले त्यात सुनिल तटकरे यांचा सिंहाचा वाटा होता, असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी केले.