विना मास्कप्रकरणी १५ जणांवर दंडात्मक कारवाई…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या १५ जणांकडून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आजअखेर १३३१ व्यक्तींकडून १ लाख ३९ हजार १८० रुपये दंडाची वसुली केली आहे. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. यासंबंधी प्रशासन सातत्याने जागृती करीत आहे. तरीही काही जण विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यांच्या… Continue reading विना मास्कप्रकरणी १५ जणांवर दंडात्मक कारवाई…

आजअखेर ७८ हजारांवर कुटूंबांचे जणांचे सर्वेक्षण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेअंतर्गत कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत ७८ हजार ३२३ घरांचे आणि ३ लाख ४१ हजार १६९ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या तालुकानिहाय अशी : आजरा २८३१, भुदरगड २०३३,… Continue reading आजअखेर ७८ हजारांवर कुटूंबांचे जणांचे सर्वेक्षण

कंबरेच्या वेदनेपासून आता मुक्त व्हा;  डॉ. सटाले यांचा चुंबकीय पट्टा गुणकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. वाढत्या वयामुळे कंबरेच्या मणक्यामध्ये हाडांची झीज होते. स्नायूंचा आकुंचनपणा, मार लागणे, दबणे, बसण्या-उठण्याच्या चुकीच्या पद्धती, आहारातील बदल, यामुळे मणक्याचे विकार वाढतच आहेत. मणक्याच्या विकारातून कायमचे मुक्त होण्यासाठी गेल्या २५ वर्षांच्या संशोधनातून डॉ. सटाले केंद्राने चुंबकीय पट्टा तयार केला आहे. या पट्ट्याच्या नियमित वापराने… Continue reading कंबरेच्या वेदनेपासून आता मुक्त व्हा;  डॉ. सटाले यांचा चुंबकीय पट्टा गुणकारी

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७१४ कोरोनाबाधित : १७ जणांचा मृत्यू    

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ७१४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १०३८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १००९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७१४ कोरोनाबाधित : १७ जणांचा मृत्यू    

ब्रेकिंग न्यूज : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

बेळगाव (प्रतिनिधी) : रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी (वय ६५) यांचे कोरोनामुळे आज (बुधवार) निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंगडी यांना ११ सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. सुरेश अंगडी हे बेळगावमधील सदाशिव नगरमध्ये ते राहत… Continue reading ब्रेकिंग न्यूज : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

जि. प. सदस्य हेमंत कोलेकरांच्यावर गुन्हा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीत शपथपत्रात गुन्ह्याबाबत माहिती लपविल्याप्रकरणी नेसरी जि. प. मतदार संघाचे सदस्य हेमंत कोलेकर यांच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नेसरी येथील प्रकाश दळवी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नायब तहसिलदार अशोक पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दाखल केली. याबाबत अधिक… Continue reading जि. प. सदस्य हेमंत कोलेकरांच्यावर गुन्हा

शिरोली दुमालातील कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबियांची तहसिलदारांकडून विचारपूस

सावरवाडी (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची करवीरच्या तहसीलदार शितल मुळे-भांबरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच काळजी घेण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत गट विकास अधिकारी जयंत उगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. डी. नलवडे, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, करवीर पं.स. सदस्य राजेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते. शिरोली दुमाला… Continue reading शिरोली दुमालातील कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबियांची तहसिलदारांकडून विचारपूस

फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करावी : भाजपाची मागणी 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या पालकांच्या समोर शैक्षणिक फी भरण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले.  या निवेदनात, सध्याच्या या आर्थिक संकटामध्ये चालू शैक्षणिक वर्षाची फी ५०% शासनाने भरावी व उर्वरित ५०% फी माफ… Continue reading फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करावी : भाजपाची मागणी 

करवीर तालुक्यात खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय…

सावरवाडी (प्रतिनिधी) : गेल्या चार-पाच दिवसापासून करवीर तालुक्यात जोरदार रब्बीच्या पावसाने जोर धरला आहे. दररोज पावसाच्या हजेरीने खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. ऐन भरणीला येणारी भाताची पीके कोलमडू लागली आहेत. परिणामी भातपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. जोरदार पावसामुळे करवीर तालुक्यात सर्वत्र भुईमग, सोयाबीन पिकांच्या काढणीची कामे थंडावली आहेत. जोरदार पावसामुळे आडसाली ऊस लागणीच्या… Continue reading करवीर तालुक्यात खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय…

लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा : तहसिलदार शीतल मुळे-भामरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम करवीर तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यात येईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधी आपल्या गावात मोहिमेची प्रचार, प्रसिद्धी करुन गावकऱ्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी केले. यावेळी त्यांनीउजळाईवाडी येथे भेट देऊन आरोग्य पथकामार्फत सुरु असलेल्या तपासणीत सहभाग घेतला. तहसिलदार म्हणाल्या की,… Continue reading लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा : तहसिलदार शीतल मुळे-भामरे

error: Content is protected !!