आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा

जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. जरांगे यांची प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, पण असं आवाहन केलं. तसेच आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाहीत. आपण राजकारणात नाही, लोकसभा निवडणुकीत कोणाला उभे केले आहे, कोणाला पाडा हे देखील मी सांगितले नाही. पण त्याचा गैर अर्थ काढू नये. मी व समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही, आम्ही एकपण अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही. परंतु विधानसभेसाठी सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

लोकसभेला जरी उमेदवार उभे केलेले नसले तरी विधानसभेला सर्वच्या सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. लोकसभेला कोणाला पाडा हे सांगितलेले नाही. पण त्याचा कोणी गैर अर्थ काढू नये. मी किंवा समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही. तसेच एकही अपक्ष उमेदवार उभा केलेला नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली.

आंबेडकर किंवा छत्रपतींच्या गादीचा मान राखायला हवा, असेही जरांगे यांनी सुचविले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंसमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु तो मराठा समाजाने नाकारला होता. यामुळे जरांगे यांनी लोकसभेला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.