कोल्हापूर (प्रतिनिधी) : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या आणि ज्येष्ठ लेखिका जयश्री जयशंकर दानवे यांच्या ३६ व्या ‘अब्द अब्द’ या ललितसंग्रहाला करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन यांच्या वतीने द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य पुरस्कार वितरण शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन सभागृहात होणार आहे. या पुस्तकात कोल्हापूरची वैशिष्ट्ये, नृत्याविष्कार, ज्ञानपीठ विजेते, संगीत वारसा,  सौंदर्य विजेत्या, भोंडला, कलेतिहास, तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच अशा वेगवेगळ्या विषयांवरील वीस लेखांचा समावेश आहे.

जयश्री दानवे यांची आजपर्यंत अनेक कथासंग्रह, व्यक्तीचित्रणं, ललित लेख, बालकथासंग्रह अशी छत्तीस पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांच्या ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला दहा पुरस्कार तसेच हिरवी चादर रुपेरी पडदा, सांगीतिक दीपस्तंभ, साहित्यिक मानदंड, जंगल बुक, स्पंदन, दरवळ, अद्वितीय, बेमिसाल, आनंदाच्या बिया, अलौकिक, अभिनायांकित अशा अनेक साहित्यकृतींना महाराष्ट्रातून पुरस्कार लाभले आहेत.