कोतोली (प्रतिनिधी) : धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी केलेल्या तिरपण (ता. पन्हाळा) येथील ६० वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

येथील सरसाबाई पांडुरंग माने या आपल्या जुन्या घरातील जनावरांच्या शेडामध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. जनावरांच्या शेडमधील सर्व कामे आटपून कपडे धुतली व ती कपडे घराच्या भिंती बरोबर लाईटच्या पाइपला बांधलेला तारेवर वाळत घालत असताना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेसात वाजता घडल्याने सकाळ सकाळी गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

याबाबत वीज वितरणाचे शाखा अभियंता महांगरे यांच्याशी संपर्क साधला असता सदरचा प्रकार वाईट घडला आहे. पण, यामध्ये वीज वितरणाची काही चूक नाही उलट संबंधित माने कुटुंबाने विजेच्या पाइपला बांधलेल्या तारेने व मीटरमध्ये उंदराने वायर कट केल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले.