मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकेमकांवर आरोप करत आहे. अनेक तोफ डागत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यावर अनेक नेत्यांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी PM मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानटसम्राट आहे. मोदी केव्हा काय बोलतील. कधी डोळ्यातून अश्रू टाकतील, कधी हसतील?, याचा काही नेम नाही, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर उपरोधिक टोला लगावला.

काय म्हणाले नाना पटोले..?

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानटसम्राट आहे. मोदी केव्हा काय बोलतील. कधी डोळ्यातून अश्रू टाकतील, कधी हसतील? जेव्हा नोटबंदी झाली. जनता आपल्या घामाचा पैसा काढण्यासाठी रांगेत उभे राहिले तेव्हा मोदी जपानमध्ये जाऊन टाळ्या वाजवत होते, मी देश कसा केला हॆ सांगत होते. त्यामुळे मोदी हे मोठे नटसम्राट आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

नाना पटोले पुढं म्हणाले, ते बोलण्यामागील मोदींचा हेतू काय? हे कुणालाच लवकर लक्षात येत नाही तर वेळेवर आपण सत्तेत येणार की नाही? अशी भिती सध्या मोदींच्या मनात निर्माण झाली आहे. ‘आम्ही मागच्या निवडणुकीत आमने-सामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे.’, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी एका वृत्तवाहिनेच्या मुलाखतीत म्हटलं होतं. यावर नाना पटोलेंनी पलटवार केला आहे.