एका मुलाखतीत पूजाने लग्नाबद्दल आपले विचार मांडले

मुंबई – पूजा भट्ट ही बॉलीवूडमधले एक नामवंत नाव आहे. ती आलिया भट्टची बहीण व महेश भट्ट ची मुलगी या ओळखी सोबतच ,ती १९ च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री, व दिग्दर्शक आहे. तिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. यात दिल हैं कि मानता नही, आणि बॉर्डर सारख्या सिनेमाचा समावेश आहे. तिचे अनेक अभिनेत्या सोबत नाव सुद्धा जोडले गेले होते. पूजा तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यांमुळे ही खूप चर्चेत असते. विशेतः आपल्या रोखठोक विधानामुळे ती कायम चर्चेत असते. आज पूजा अशाच एका वेगळ्या कारणामुले चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत पूजाने लग्नाबद्दल आपले विचार मांडले आहे.

पूजा भट्ट म्हणाली“मला नेहमी विचारलं जातं, तू अजून लग्न का नाही केलंस? तू सिंगल का आहेस? तू इतकं छान आयुष्य जगतेस. तू आकर्षक महिला आहेस. एखाद्या मुलाशी आम्ही तुझी ओळख करून देतो. हे सर्व प्रश्न ऐकल्यानंतर माझं एकच उत्तर असतं की, बॉस.. मला वाचवण्यासाठी कोणाची गरज नाही. काही लोक माझ्याजवळ येतात आणि म्हणतात की लग्न कर. त्यांच्या या म्हणण्यावर माझा सवाल असतो की, अरे का करू मी लग्न? त्यांना मला कोणाशी तरी भेट करून द्यायचं असतं. पण मला कोणालाही भेटायचं नाहीये. मी मॅचमेकर शोधत नाहीये”,

पूजा पुढे म्हणाली , “माझं जेव्हा लग्न व्हायचं असेल तेव्हा होईल. जेव्हा एखादी व्यक्ती भेटायची असेल तेव्हा ती मला भेटेल. फक्त एक पुरुष हा प्रत्येक गोष्टीचं समाधान असू शकत नाही. आपण स्वत:च स्वत:ला सावरलं पाहिजे. एक लाइफ पार्टनर शोधण्यापेक्षा उत्तम पर्याय म्हणजे मित्रासारखा जोडीदार भेटणं. जर मला असा एखादा कम्पॅनियन भेटला तर माझ्यासाठी ते सर्वोत्तम असेल. जरी तो नाही भेटला तरी माझ्या आयुष्यात इतर खास लोकं आहेत, ज्यांच्यासोबत मी खुश आहे. माझे वडील आहेत, कुटुंबीय आहेत, माझ्या मित्रमैत्रिणी आहेत. माझं काम उत्तम चाललंय. माझं आयुष्य खूप सुंदर आहे. केवळ मी सिंगल असल्याने माझं आयुष्य अपूर्ण नाही.” असं ती म्हणाली