इचलकरंजी (प्रतिनिधी) : शासनाने आज (शनिवार) पासून पुन्हा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये अकरा वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवासोडून जे व्यापारी आपले उद्योग चालू ठेवत आहेत तसेच विनाकारण गाडीवरुन रस्त्यावर फिरणाऱ्यांवर इचलकरंजीमध्ये कारावाईचा बडगा उचलला आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक एस. पी. गायकवाड, ग्रामीण पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार गावभागचे सपोनि. गजेंद्र लोहार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि. श्रीकांत पिंगळे, शहापूर पोलीस ठाण्याचे सपोनि. शिवप्रसाद यादव, वाहतूक निरीक्षक विकास अडसूळ यांनी कारवाई करत अनेक गाड्या जप्त केल्या. तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली.