नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. तर पंतप्रधानांच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाच्या माध्यमातून अहंकाराची मान झुकवली आहे. अन्यायाच्या विरोधात मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन. जय हिंद, जय हिंद का किसान !
दरम्यान, तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्यांचाच एक वर्ग कायद्यांना विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.