पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरुन सुरु असलेल्या शाब्दिक वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. त्याचदरम्यान बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. यावेळी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील झाला आहे. 

कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाल्याने राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फोन केला. बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदवली आहे.