कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे महत्व या विषयावर डॉ. अशोक वाली यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. आर. जी. पवार हे होते.

डॉ. वाली यांनी रानभाज्यांची ओळख, प्रकार व त्यांचे औषधी गूणधर्म याबाबत माहिती दिली. दैनंदिन जीवनात रानभाज्यांचा वापर कसा करावा, हे दर्शवणारा छोटासा माहितीपटही सादर करण्यात आला.

व्याख्यानप्रसंगी इनॉला अशा केना, पेंडुर, काटेकोळशेंदा, मोरशेंड, चांगेरी, वंशवेल, औदूंबर जलाची माहिती देण्यात आली. डॉ. सुमन बुवा यांनी कार्यक्रमाचे संयोजन, तर स्वागत आसावरी कागवाडे यांनी केले. परिचय डॉ. श्वेतलिना पाटील यांनी करून दिला. यावेळी डॉ. वसंत सिंघन, डॉ. गोखले, उदय घाटे उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर जाधव यांनी केले. अरविंद पालके यांनी आभार मानले.