मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून एनडीए आघाडीखाली सरकार स्थापन केलं. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मात्र इंडिया आघाडीचे नेते हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा करत आहेत. यातच गल्लीपासून दिल्लीपर्यंत दररोज नवनवीन राजकीय भाकितं करणारे संजय राऊत यांनी आज पुन्हा नवा दावा केला आहे.

दरम्यान, एनडीए सरकारमध्ये लोकसभा अध्यक्षपद कोणाला यावरून तर्कवित्रक लावले जात असताना, लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ही जोडी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा राऊतांनी केलाय. तर चंद्रबाबा नायडूंनी लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याचं कानावर आल्याचं राऊत म्हणाले. तर 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसंदर्भात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी हे मोठं विधान केलंय.

यावेळी संजय राऊत म्हणाले, लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्रबाबू नायडू यांनी उमेदवार दिला, तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत महत्वाचं असून राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपचे एजंट म्हणून काम केले होते”.
विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्षा फुटला तरी ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीने म्हणजे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचे सांगितले. शिंदे यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सांगितले. या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तरीही राहुल नार्वेकर अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे .

संजय राऊत म्हणाले, देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारले आहे, नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. मोदींच्या झुंडशाहीचा हुकूमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय. त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे. पारदर्शक पद्धतीने उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने, घटनेने विरोधी पक्षाला मिळाला हवं. आता नरेंद्र मोदींचा काय ताम जाम राहिलाय मला सांगा. टेकूवर बसले आहे. टेकू कधीही पडू शकतो. राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो.

मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ भेटीवर राऊत म्हणाले, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेते पदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे. जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेते पदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडी च्या घटक पक्षाची बैठक बोलून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आलं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो.