शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपव्दारे पिकांची नोंद 15 जानेवारी पर्यंत करा : अमोल येडगे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे, पीक कर्ज पुरवठा इत्यादी करिता पीक पाहणी नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी अॅपव्दारे दिनांक 15 जानेवारी पर्यंत शेतकरी स्तरावर पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. “माझी शेती माझा सातबारा मीच… Continue reading शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपव्दारे पिकांची नोंद 15 जानेवारी पर्यंत करा : अमोल येडगे

शेतकऱ्यांनी नॅनो खताचा वापर वाढवावा : संजय शिंदे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पारंपरिक खत वापरामुळे होणारे नुकसान आणि नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे फायदे पाहता जमिनीचे आरोग्य वाचवण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे अन्न उत्पादन करण्यासाठी नॅनो खताचा प्रचार करणे ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी नॅनो खताचा वापर वाढवावा, असे मत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण… Continue reading शेतकऱ्यांनी नॅनो खताचा वापर वाढवावा : संजय शिंदे

कळेत कृषी कन्यांचे स्वागत..!

कळे ( प्रतिनिधी ) : पन्हाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कृषिकन्या प्रियांका घार्गे, रेवती घार्गे, श्वेता चव्हाण, श्रावणी गुरव, वैभवी घाडगे, सानिका गावडे, पूनम चोपडे या ग्रामीण कृषि आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांचे स्वागत सरपंच सुभाष पाटील, उपसरपंच शांताबाई… Continue reading कळेत कृषी कन्यांचे स्वागत..!

दिंडनेर्लीतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार कृषी कन्यांच बळ

दिंडनेर्ली प्रतिनिधी ( कुमार मेटिल ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषी कन्यांनी दिंडनेर्ली येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रम राबवत दिंडनेर्ली ता. करवीर या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गादी वाफा तयार करणे, आळे पद्धतीने खते देणे, जैविक कीड नियंत्रण, बीजप्रक्रिया, माती परीक्षण, दशपर्णी अर्क तयार करणे , विविध पिकांची माहिती देणाऱ्या ॲपची… Continue reading दिंडनेर्लीतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार कृषी कन्यांच बळ

असंडोलीत अग्नितांडव..! शॉर्टसर्किटने साडे पाच एकर ऊस जळाला

गगनबावडा ( प्रतिनिधी ) गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथे ऊसाला आग लागून साडेपाच एकर ऊस आगीत भस्मसात झाला असून येथील शेतकरी काशिनाथ पाटील, महादेव पाटील व संजय पाटील या तिघांचे समाईक क्षेत्र जळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गट नंबर 222 व 223 क्षेत्रातील 6 एकर ऊसाला आग लागली आहे. महावितरणने शेतीच्या पाण्यासाठी थ्री फेज कनेक्शनसाठी पोल उभा… Continue reading असंडोलीत अग्नितांडव..! शॉर्टसर्किटने साडे पाच एकर ऊस जळाला

error: Content is protected !!