गगनबावडा ( प्रतिनिधी ) गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथे ऊसाला आग लागून साडेपाच एकर ऊस आगीत भस्मसात झाला असून येथील शेतकरी काशिनाथ पाटील, महादेव पाटील व संजय पाटील या तिघांचे समाईक क्षेत्र जळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गट नंबर 222 व 223 क्षेत्रातील 6 एकर ऊसाला आग लागली आहे. महावितरणने शेतीच्या पाण्यासाठी थ्री फेज कनेक्शनसाठी पोल उभा केला आहे. याच्या वायर पूर्णपणे खाली असल्याने ऊसाला आग लागली आहे.

स्थानिक शेतकरी म्हणाले की, दिलेल्या माहितीनुसार विजेरी पोलवरील तारा गेले अनेक दिवस पूर्णपणे खाली लोंबकळत असून त्यावर कोणताही पक्षी बसला तरी शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे ऊसाला आग लागली.

यावेळी ही आग विझवण्यासाठी गावातील 50 ते 60 लोकांनी जळलेल्या भागापासून ऊस तोडत आग विझवण्यात आले, परंतु तोपर्यंत साडेपाच एकर ऊस जळून खास झाला या उसाची नुकसान भरपाई शेतकऱ्याला लवकरात लवकर मिळावी.