मुंबई – सध्या देशात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर वैयक्तिक खालच्या थराला जाऊन जहरीली टीका करत आहेत. एकमेकांवर वार करण्याची एक ही संधी हे नेते सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचं एक वक्त्यव्य गळ्याशी आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान असे म्हणत उद्धव ठाकरे हल्लाबोल केला होता. त्यावर आता राज्यभरात पडसाद उमटत आहेत. राज्यातील शिवसेना पंतप्रधान मोंदींच्या त्या वक्त्याव्यावर भडकल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सुद्धा संतापल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकऱ्यांना नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाचे संतान अशा शब्दात त्यांनी मोदींवर घणाघात हल्लाबोल केला आहे

काय म्हणाले संजय राऊत..?

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंना कोणी नकली संतान म्हणत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे. मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना संपूर्ण राज्य मानायचं, लोकं त्यांची पूजा करतात. मात्र मोदी हे विसरले आहेत. त्यांच्या डोक्यात काही गडबड झालीये असं वाटतंय. मा. बाळासाहेब आणि माँसाहेब यांच्या मुलाबद्दल असं विधान करणं, शिवसेनेला नकली म्हणणं हा राज्याचा अपमान आहे. तुमची एवढी हिंमत? त्यांना तुम्ही नकली म्हणता ? कोणी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचा अपमान करत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुम्ही तुमच्या संतानाबद्दल बोला की… तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल असं विधान करत असाल तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज आहात, त्याचे संतान आहात अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. जे महाराष्ट्रावर चालून येतील त्यांना आम्ही गाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

काय म्हणाले pm मोदी..?

pm मोदी म्हणाले , काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातले लोक अरबमधील लोकांसारखे दिसतात. मी जरा बाळासाहेब ठाकरेंचे नकली शिवसेनेचे पुत्र आहेत, त्यांनी जरा बाळासाहेबांना आठवावं. मला बाळासाहेंबांच्या नकली मुलाला विचारायचं, त्यांचे मेंटॉर वयोवृद्ध नेत्यालाही विचारायचंय की, यांनी म्हटलंय पश्चिम भारतातील लोक अरब वाटतात. महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे? काँग्रेसला वाटतं की, उत्तर भारतातले लोक गोऱ्यांप्रमाणे दिसतात. तुम्ही हे वक्तव्य मान्य कराल? सत्तेसाठी देशाची वाटणी करणारी काँग्रेस आता भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यावर उतरली आहे.”