मुंबई – सध्या बॉलिवूडमध्ये आयुष शर्मा याची जोरदार चर्चा सुरु आहे. आयुष शर्मा याचा नुकताच ‘रुसलान’ सिनेमा प्रदर्शित झाला.या सिनेमात त्याच्या अभिनयाची चर्चा सुरु आहे. आयुष शर्माने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयुष नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आज तो त्याच्या वैयक्तिक कारणाने चर्चेत आला आहे. सध्या बॉलिवूडमध्ये आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांनी 2014 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नात बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अर्पिता आणि आयुष यांच्या लग्नाना 10 वर्ष झाली आहे. आता दहा वर्षांनंतर आयुष आणि अर्पिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. याबद्दल आयुषला विचारले असता त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला आयुष शर्मा..?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष याने घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं आहे.आयुष शर्मा म्हणाला, ‘एकदा एका पापाराझीने मला विचारलं अर्पिता हिच्यासोबत तुझं घटस्फोट होत आहे का?‘ यावर हैराण झालेला आयुष म्हणाला. ‘मी माझ्या मुलासोबत दोसा खाण्यासाठी बाहेर निघालो होतो. तेव्हा एका पापाराझी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू अर्पिता खान हिला घटस्फोट दिणार आहेस का?’ ‘माझ्या आणि अर्पिता बद्दल रंगणारी चर्चा ऐकून मी हैराण झालो. घरी आलो आणि मी अर्पिताला विचारलं, तू मला घटस्फोट देणार आहेस का? यावर आम्ही एकत्र बसून प्रचंड हसलो.’ असं म्हणत आयुष याने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. पुढे पत्नी अर्पिता हिचं कौतुक करत अभिनेता म्हणाला, ‘अर्पिता कायम मझी साथ देते आणि ती माझ्यावर टीका देखील करत असते. अर्पिता हिला सत्य घटनांवर आधारित सिनेमे अधिक आवडतात.’ असे तो म्हणाला