असा खरपूस समाचार शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी घेतला….

कोल्हापूर – सध्या कोल्हापुरात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष प्रचारात विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. अशातच कोल्हापुरातील शिंदे गटाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले आमदार वैभव नाईक यांनी किरण उर्फ भैय्या सामंत यांना सल्ला देण्यापेक्षा आपल्या खुर्चीची चिंता करावी असे म्हणत त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे

काय म्हणाले रुपेश पावसकर..?

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर म्हणाले, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणे व सामंत बंधू यांच्यामध्ये झुंज लावण्यापेक्षा आपल्या खुर्चीची चिंता करावी महायुती अभेद आहे.महायुतीचा उमेदवार हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तिन्ही नेते उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरविण्यासाठी सक्षम आहेत.उबाठाचे खासदार .विनायक राऊत यांचा पराभव अटळ आहे.भविष्यात महायुतीचे खासदार निवडून गेले तर आमदार वैभव नाईक यांनी स्वत:च्या खुर्चीचे आत्मपरीक्षण करावे.त्याचप्रमाणे आपला देखील पराभवाचा दुसरा क्रमांक आहे हे देखील आपण लक्षात ठेवावे.वैभव नाईक यांना ज्ञात असेलही आचार संहिता कार्यकाळात ठेकेदारीची कोणतीही कामे होत नाहीत तसेच टेंडर फॉर्म देखील मिळत नाहीत.आचार संहितेत फक्त उमेदवारी अर्ज मिळतात.हे आमदार वैभव नाईक यांना ज्ञात असेल.असे ही ते यावेळी म्हणाले. यावर आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे म्हणत्वाचे असणार आहे.