कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेमधील क्षीरसागर चौक ते पापाची तिकटी, हंकारे हॉटेल ते मणेर मस्जिद रस्ता गेली अनेक वर्षे खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.  त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. तर अनेक अपघातही या खड्ड्यांमुळे घडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे लवकर डांबरीकरण करावे. अशी मागणी बुधवार पेठ, शिवसेना आणि व शनिवार पेठेतील नागरिकांच्या वतीने शिवसेना विभाग प्रमुख सुशिल भांदिगरे यांनी उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, गंगावेश ते पंचगंगा नदी या रस्त्याचे काम चालू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबा डोंगर, किल्ले पन्हाळा ठिकाणी फिरायला जाणाऱ्या पर्यटक या रस्ताचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे येथील वाहतुक नागरी वस्तींमधून अधिक वाढला आहे. तरी लवकरात लवकर याची दखल घेऊन नागरिकांच्या रोषाला सामोरे न जाता या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी केली आहे.

यावेळी शाखा प्रमुख कपिल नाळे, किशोर घाटगे, निलेश हंकारे, सचिन क्षीरसागर, राजाराम जाधव,यश नाळे, विनोद हजारे, क्लपेश नाळे, राहुल जठार, अथर्व ठाकूर, मयुरेश भांदिगरे, राज कापसे आदी उपस्थित होते.